Tuesday, 9 December 2014

माझ्या लेखी मी जीवन जगलो हे मी ठासून तेंव्हाच प्रतिपादन करू शकेल जेंव्हा मी  -

एखाद्या अनाथाला तो / ती अनाथ नसल्याची जाणीव करवून देऊन आनंदी करवू शकलो , अन  त्याच्या मनापासून त्याला / तिला हसवू शकलो तर मी जगलो .

एखाद्या गरजूला शालेय , महाविद्यालयीन गरजेच्या नोट्स देऊ शकलो

भुकेलेल्याला अन्नच नाही तर ज्याला जो पदार्थ खायची इच्छा  झाली तो पदार्थ त्या व्यक्तीला देऊ शकलो ,

आई-बाबांची आवडती  सिरीयल त्याना tv  वर लाउन देऊन त्यांच्या डोळ्यांतील आनंद पाहून माझ्या डोळ्यांत जी आनंदाची आसव येतील ती अनुभवू शकलो .

कोणाला त्याच , तीच प्रेम  जर खरच कायम राहावं अशी इच्छा ठासून असेल त्या एकमेकाना नैतिक अन सुंदरश्या नात्यात कायमस्वरुपी  गुंफवू  शकलो .

कोणाच्या बुद्धीच कोडकौतुक इतरांकरवी व्हावं याकरता जर त्यांनी गमतीत माझा पच्का  करवून माझ हास उडवून जरी घेउ शकलो अन त्याना आनंदी  करवू शकलो ,

आपला मनातील आनंद हा दुसरयाच्या आनंदात साकार करवून निर्लेप मनाने जगू शकलो .

कोणाच्या त्रस्त मनाला आनंदी करवू शकलो तर

अशी  इत्त्यादी तर अमर्याद सात्विक कारणं आहेत व राहतील ,

कारण मला जगताना जगण्याची अनुभूती तर मिळवायचीच आहे पण मी मेल्यावरही जगावं फक्त आदर्शांच्या रूपाने (माझ्या पुतळ्यांच्या रूपाने नव्हे ) जगावं हीच इच्छा

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home