Friday, 23 January 2015

जेवण  करवत  नाही न काही  खायला जात  कारण  कित्त्येक  लोक उपाशी  झोपतायत  ?
कित्त्येकाना  नाहीत घर राहायला
कित्त्येक  जण  दारुड्या  बापाचं , नवऱ्याचा  मार खातायत ?
कित्त्येक  जण  शारीरिक  , मानसिक  दुखण्यात  होरपळतायत ,
कित्त्येक  जण  मन मारत  दिवस  ढकलतायत  पण  मरण येण्याची  वाट  पाहूनही  मरण येत नाहीये

अमेय तू कोण रे तीसमारखां लागुन  गेलायस ?
तुझी  लायकी नाही जगायची , गो टू  हेल  

तू  कधी  कधी  मुद्दाम  देखील  वाईट  असल्याचा  आव आणून  वाईट वागलायस  , कधी  मुद्दाम   स्वता:ला फालतू  म्हणवून घेववलयस  , टुकार  मित्रांच्या  संगतीत  फसत गेलास  पण  तू आधी किती चांगला होतास  अमेय ? मग का बिथरत गेला तुझ्या सद्सद विवेक बुद्धीचा  तोल ?
पण  तू चुका  केल्या असतील पण अपराध , गुन्हे नाहीत आणि ज्याची शिक्षा तू भिंतीवर स्वताच  डोक  आपटून  , ब्लेडनी  स्वताचे  तळहात कापून करवून घेतलीस , आता सुधर आणि चांगला वाग ,

स्वाती  तुझ जिवन  आहेच  , ती  सुखी  रहावी  याकरता  तू  तिच्या पासुन  दूर  जा ,
होईल  तुला मरणयातना  तिच्या  अबोल्याने पण तरी तू आनंदी  असल्याचा  आव आणत  जग , नाहीतरी  तसही  तुला आईबाबा  असे  तोपर्यंतच  जगायचय
गूगल सर्चवर  पेनलेस  आत्महत्या  टिप्स  वाचल्याच  आहेस तू तशाही

तू का जन्माला आलास रे अमेय?

त्या नव्या कन्यादान सीरियलसारख  जर बंडू  मामानी  विचारल तर मीही सांगीलच की हो -
मी  तिला कशाला  कमी  नाही पडू  देणार 
मी तिला फुलापेक्षा  जास्त जपेल 
आणि   मी  तिला  वडिलांचीही  माया देऊ शकतो 

पण मी  जाणतो  की तिला मी  नाही  आवडत  तर मी  त्याग  करून  हिमालयात  निघून  जायला  पाहीजे  पण  मला आईबाबांची  सेवा  करायचीय , गोरगरीबांकर्ता समाजकार्य  करायचय  

तिला  २७ जुलै  ला त्या भारत  मॅट्रिमोनी  चा कॉल  आलेला तर तीच चांगल होऊदे  अमेय  , तू तिला  कधीच आठवणार  नाहीस इतक  दूर  चालल्या  जा तिच्यापासून , तू  खुप मन दुखावलायस  तीच खर तर तुला जगायचा  अधिकार  नाही  पण तुझी  हीच  शिक्षा  की तू  आयुषःयात फ़क्त  रडत  रहा पण  लोकांची  सेवा  करायच व्रत नको सोडूस ,
तुला सगळे  फसवत  आलेयत  पण ती  तुला  दैवी  अवतार  म्हणून  आली आणि  तू  तिचच  मन दुखवलस 
फार  पापी आहेस अमेय तू , 
खानदानी  कट्टा , मित्र  हे तुझे जीव की प्राण  पण  सगळ  त्याग आता तू 

तू तिचे मेसेज व्हायरल कधीच करणार नव्ह्तास न करशील पण ते सेव्ह केले केवळ  तिच्या आठवणीत रडायला ते वाचता वाचता पण आता ते ही डिलीट कर कारण तिच सुख तुझ्यात नाही रे , तुझी काय लायकी रे अमेय ?
तू न कधी  आई बापाला सुख दिलस ना कोणाला 
तुझ्यासारख्या  मनहुस  , करँट्यानी जन्मायालाच नको खरतर 
तू चालला जा हरेकापासून दूर कायमच 
आणि नको परतूस  परत  कधीच  
तू तिला सर्व सांगणार  होतास अगदी तुझ्या चुकापण  कारण  तू तिला  देवीच  मानायचास जिच्यासमोर  प्रायश्चित्त  होऊ  शकत पण  तू तिचा विश्वास गमावलास ,

आज बेबी ताईला  भेटून दवाखान्यातून घरी  येऊन एकांतात रडलास तू तिला लावलेल्या नळया , सलायन पाहुन , का रे देवा असे  शारीरिक  दुःखः देतोस ?

बंडूमामा  चिड़चिड़ करतात  पण  स्वभावाने खुप हळवे  आहेत ते , तलत मेहमूद चे  गाणे ऐकून  त्या भावाची  आठवण  येऊन  रडले  ते ज्या मामाला  तू पाहू नाही शकलास  , किती  खाऊ  घालू आणि किती  नाही अस होत  त्यांना  कोणी  गेल  की त्यांकडे , बिचारयाला  गुडघेदुखी  असूनही  ते बोरीवली  स्टेशनला सोडायला आले , पाणी  बाटली  घेऊन  दिली , किती  आस्थेवाईकपणे  चौकशी  करतात हरेकांची , त्यांना  सर्व  सुख  समाधान  मिळत  राहो , त्यांची मांडी  दुखण बर   होऊदे

आता तर blog  च नाव बदलल ती  कधीच हे विचार वांचू शकणार नाही ,  blog  फ़क्त तिच्याकरता लिहायचो तीच नाही आता ,
मी  whats  app  वर का येतोय गृपवर  कारण मला सर्वांसोबत रहायचय पण तिला माझ गृपवर  असण जर खटकत असेल वा अनसेफ वाटत असेल तर मी ग्रुप  त्यागण च इष्ट आहे , तिला मी  कधीच बोलणार  नाही  जार तिला  माझ्याशी बोलण्यात  तिटकारा जाणवत असेल तर , तिच्या पायाच्या  धुळीचीही  लायकी नाही आपली , ती  खुप श्रेष्ठ आहे अमेय ,  यु  जस्ट इग्नोअर हर फॉर  हर हैप्पिनेस ,
तू तिला त्रास होईल ,  दुखेल अस वागलायस  म्हणून च तिने त्या  स्ट्रेंजर मेसेज करवी तुला टोमणा  मारला   गृपवर  ,
तसही कोणी  कोणाच्या मनाचे केवळ  वेध घेऊ शकतो , समजू शकतो  ज्याच्या व्यथा  तोच जाणतो ,

Wednesday, 21 January 2015

मी आता कधी  कुठल एपलीकेशन वापरून पाहणार नाही , ना whats  app  ना इतर काही  

तिची काहीच चूक नाहीये बिचारीची , ती कधी न माझ्या भावनांशी खेळली ना कधी  तिनी मला त्रास दिला , पागल तर मीच होतो 
मी  त्या देवीला  फार  दुखावलय , देव मला नर्कात देखील जागा द्यायचा नाही , 
 

आज माझा सर्वांवरचा विश्वास उडाला , ज्या जिवलग मित्रांना मी मोबाईल द्यायचो त्यांनी माझे जीमेल , गूगल पासवर्ड शिताफिने कधी चोरले किंवा त्याना ते कसे कळाले माहीत नाही पण माझ्या जीमेल , गूगल सर्च मधे अक्षम्य घोळ केला त्यांनी , मला अक्षरषा: मरण याव वाटतय, मी  फार  विश्वास ठेवतो आणि फसगत करवून घेतली स्वता:ची , 
मी  कल्पना ही नाही करू शकत की ते इतक्या खालच्या थराला जाऊ शकतील

Sunday, 4 January 2015

देवा मी खरच का रे हे एकांताचे विरह झेलतोय ? का रे एकाही नातलगाला विचारावही वाटल नाही मी जिवंतही आहे की मेलोय? 
मन तर मरूनच गेलय तस , नको रे देवा निदान घरी तरी वाद कटकटी , कोणाच्याच नको ,
एखाद्याची मी खूप कीव करतो , मला  दया वाटते पण का रे देवा त्याना तशी दुखः देतोस रे तू ?
का कुठे शांतता नाहीये जिवाला ? 
झोपेच्या गोळ्या ज्या आज्जी साठी आणल्या त्यातल्या गुपचूप २ मी स्वता: नजर चुकवून घेतल्या त्याने माझ डोक जड पडून कृत्रिम तर झोपलो मी पण मला कायमचच झोपवं देवा पण नको रे तिच्या मनात माझ्या विषयी कुठली आडकाठी ठेउस , रोज मारण्यापेक्षा मला एकदाच मरण दे 

मी कोण आहे रे देवा ? मी स्वार्थी असलेल नको करूस माझ मन

हे देवा ती गोळ्या घेत होती तर तिला काही पोट दुखी तर नाहीये ना ? ती बिचारी ९ नोव्हेंबर ला काहीच खाउ नाही शकली , प्लीज रे देवा तिला , तिच्या आई बाबाना चांगली तब्ब्येत दे , तस हरेकालाच तू सुख देत जा , कधी कोणी दुखात नको असुदे , सर्वांच भल होऊ दे

देवा कधी माझी आईपण चुकली काही वेळा अस वाटत रे , मामी आजारी असताना आईनी भेटायला जायला हव होत पण आईच आजारी असते हे ती मलाही सांगत नाही हे मी जाणतो त्यामुळे तीही चुकत नाहीये ना रे

देवा ती बिचारी कदाचित माझे मेसेज वाचतही असेल रे , पण तिची अवस्था अशी असेल की ते गाण  आहे तस की - मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला? ह्या कडव्यानुसार 
आता तर ती वाचूच शकत नाही माझा हा ब्लॉग त्यामुळे हा ब्लॉग  माझ्या एकट्या पुरताच राहील व कायम असेल जोवर मी जिवंत आहे , तिला वचन दिलय की मी हा ब्लॉग  कधी शेअर नाही करणार ,
देवा तुम्हा ३३ कोटी देवाना शप्पथ आहे फक्त तिला एकदातरी मला निदान (ओके) इतक तरी पाठवायची सुबुद्धी द्या हो , मी मेल्यावर हा ब्लॉग  कालौघात नष्ट ही होईल पण मी ह्या ब्लॉग  च रहस्य्य कधीच कोणाला कळू द्यायचो नाही

मला कोणाला कधी दुखवायचं नाही , हरेकाला मन आहे हे मी आधी जाणतो माझ्या मनातील सर्व काही बोलण्या आधी , 

आता तर मी ब्लॉग  नाव बदलल तर वाचायला जी एकमेव होती तीही नाहीये त्यामुळे माझ्या मरणानंतर हा ब्लॉग उपराच राहील 
माझ मन शेवटी एकटच राहीलं , 

मला एकाही नातलगाने साधी विचारपूस देखील केली नाही की मी ग्रुप का सोडला , कोणाला कोणाशी काही घेण देण  नाही इतके सगळे  व्यस्त झाले , तसही मी बरच केल की ग्रुप सोडला कारण ती मेसेज डिलिव्हर होऊनही गपचूप नंतर वाचन  करत असेलही , माझे मेसेज मी जिला पाठवले ग्रुपवर तिनीच तोंड फिरवल , नाराज असेल ती तर माझा जाच का कोणाला ?

तिला मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील पाठवाव्या वाटल्या नाहीत म्हणजे किती हिणकस वागणूक मला दिली जातेय ,

माझ्या भावनांची जराही किंमत , कदर वाटू नये इतक मी नकोस झालोय ,
पण मी ही चुकतोच अती विचार करून फार अकलेचे तारे तोडत बसतो स्वता:च , 

मी पण किती रडलो हे तो देव जाणतोय , सर्व तो जाणतोय की मी किती दुखात आणि चिंतेत वावरतोय ते ? हरेकाला त्याच दुख मोठ वाटत इतरांपेक्षा 

पण हे देवा माझ्या बाबाना चांगली बुद्धी कधी रे देशील ?
का आईकडून थोड काही पोळ्या , स्वयंपाक शीळ उरल तर ते तिला उटसुट घालून पाडून हिणकस आणि टाकून बोलतात की तिला डोळ्यात पाणी याव ?
का रे देवा बाबा मला नेहेमी मन दुखवून बोलतात ?
काय चुकलो रे मी ? 
मी अजिबात आनंदी नाही रे देवा राहू शकत  आहे कारण कोणाच्या शारीरिक वेदना मी नाही रे पाहू शकत ?
का रे देवा ही रोगराई अन ही शारीरिक दुखणी आहेत , भोग आहेत ह्या हरेक सजीवाना ? का रे हे मन दिलस की जे नेहेमी मन मारून किंवा मनाला उलट सुलट बोलणी सहन करवून जगवाव लागतंय ?

का त्या हरेक सिनियर नी कंपनीत शिपाई काकांवर तोंडसुख घेऊन त्याना दुखवाव ? त्याना बिचारयाना किती वाईट वाटत असेल ? 
ते त्यांच्या बापाच्या वयाचे आहेत ,

देवा मी पोथी पुराण का रे वाचली ? की जिच मी मन दुखवल अस तिला वाटतंय तिला ती हरेक सुख मिळो , हाच उद्देश असायचा हे तू जाणतोस ना रे देवा ? नसो लागल्यास ती माझ्या सोबतीला पण निदान ती बोलून तर मला माझ्या चुका दाखवू शकली असती ना , 
मी का रे देवा ह्या अबोल्याची शिकार होतो नेहेमी त्यापेक्षा मला इबोला रोग जडवायचा असतास ज्यात मला शारीरिक वेदना होतील ज्या मी करू शकेल सहन पण मानसिक नाही ,

देवा मला मरण दे रे पण माझ्या आप्तांचा, तिचा अबोला नको , आणि एक उपकार प्लीज कर की मला परत जन्माला घालू नकोस. 

का रे देवा ही अशी जीवसृष्टी रे रचलेली तुझी ज्यात मोठे प्राणी लहान प्राण्याना भक्षण करतात? ससा किती गोंडस , गरीब त्याला हिंस्त्र पशूंच भय ? का रे देवा बिचारा उंदीर मांजरीच भोजन  असत? मांजर स्वता: आणि तिच्या इवल्या पिल्लाना कुत्र्यापासून वाचवते , का रे देवा हरेक जण  संकटात ?